December 11, 2023
PC News24
आमचे बोलणेआरोग्यमहानगरपालिकाराजकारण

सुस,म्हाळुंगे,बावधन पाणी प्रश्न ‘ तापला ‘,येथील सोसायट्यांना मागवावे लागते दररोज किमान पाच टँकर पाणी.

सुस,म्हाळुंगे,बावधन पाणी प्रश्न ‘ तापला ‘,येथील सोसायट्यांना मागवावे लागते दररोज किमान पाच टँकर पाणी

उन्हाची वाढती तीव्रता आणि पाण्याची वाढलेली मागणी यामुळे सध्या सुस,म्हाळुंगे,बावधन येथील सोसायट्यांचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुस मधील एका सोसायटीला दररोज किमान पाच टँकर पाण्याची मागणी करावी लागते. या परिसरातील अनेक सोसायटी यांना पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागत आहे. गेल्या काही वर्षात येथे मोठ्या प्रमाणावर सोसायटी तयार झाल्या आहेत
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून या सर्व सोसायट्यांना मंजुरी देण्यात आली असली तरी त्यांच्या पिण्याच्या पाण्याची तरतूद, सांडपाणी,
मैला शुद्धीकरण प्रकल्प, या आवश्यक गरजांची कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. मागील काही वर्षापासून येथील सोसायट्यांना बोरवेल आणि टँकरचे पाणी यावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.
सुस,म्हाळुंगे,बावधन ही गावे महापालिकेच्या हद्दीत आल्याने येथील पाणी प्रश्न सुटेल अशी नागरिकांच्या अपेक्षा होती परंतु अजून कोणताही प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसत नसली तरी महापालिकेकडून समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या टाक्या बसवण्याचे काम सुरू केले आहे. परंतु या सर्व कामाला अजून किमान दोन वर्ष वाट पाहावी लागणार असल्याने या गावातील सोसायटी यांना अजूनही काही दिवस पाणी प्रश्नाला तोंड द्यावे लागेल. याविषयी महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले की सुस,म्हाळुंगे च्या पाण्याच्या कामासाठी ची 52 कोटीची निविदा काढली आहे, तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जलवाहिनी व पाण्याच्या टाक्यांचे काम पूर्ण होइल.

Related posts

“माझी माती,माझा देश“ उपक्रमांतर्गत पिंपरी चिंचवडचा अमृत कलश जाणार मुंबई मार्गे दिल्लीला – अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे

pcnews24

पिंपरी चिंचवड:नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे – आयुक्त शेखर सिंह यांचे आवाहन

pcnews24

पालकमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमाला नाट्यगृह मात्र निम्मे रिकामे.

pcnews24

महानगरपालिकेच्या मालमत्ता बिलातील उपयोगकर्ता शुल्क वसुलीस अखेर स्थगिती-आमदार महेश लांडगे यांनी मांडली प्रखर भूमिका.

pcnews24

रावेतचे वैभव असलेले ‘मेट्रो इको पार्क’ वाचवा …

pcnews24

महाराष्ट्र:आत्ताच्या सरकारची हकालपट्टी जनताच करेल.. 2024 मध्ये महाराष्ट्रात सरकार बदलेल : शरद पवार.

pcnews24

Leave a Comment