मंत्रीमंडळ बैठकीत आज घेतले गेलेले निर्णय
– कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती. दरवर्षी 25 मुला-मुलींना शिष्यवृत्ती – घनकचरा संकलनासाठी आयसीटी आधारित प्रकल्प राबविणार. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून 100 टक्के अर्थसहाय्य. सर्व शहरांमध्ये हा प्रकल्प राबविणार. • महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन – करणार. रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने होणार.