रेल्वे अपघात- राजकीय दुखवटा जाहीर
ओडिशा रेल्वे अपघातात आतापर्यंत 233 जणांचा मृत्यू झाला असून 900 लोक जखमी झाले आहेत. बचाव कार्य सुरू आहे. त्यातच अपघातानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आज एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला. या अपघातानंतर खूप दुःख झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. मी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहे, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले.
समुपदेशन कार्यक्रमातून चार वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीसोबत घडलेली बलात्काराची घटना उघड