September 23, 2023
PC News24
धर्म

महाराष्ट्र राज्य: जनावरांच्या वाहतूकी संदर्भातील नियमांचे पालन करा अन्यथा कठोर कारवाई,बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कडक नियम.

महाराष्ट्र राज्य:जनावरांच्या वाहतूकी संदर्भातील नियमांचे पालन करा अन्यथा कठोर कारवाई,बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कडक नियम

जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांनी आपल्या वाहनांच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल करुन वाहनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन विशेष परवाना प्राप्त करुन घेणे बंधनकारक असल्याचे पिंपरी-चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी सांगितले.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते, त्या अनुषंगाने परिवहन विभागाकडून वाहतूकदारांना दक्षता घेण्याबाबत कळविण्यात आले असल्याचे आदे म्हणाले.

जनावरांच्या वाहतुकी साठी विशेष परवान्यासाठी ऑनलाईन पद्धतीने https://parivahan.gov.in या संकेतस्थळावरुन अर्ज करुन त्याचे शुल्क या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जमा करावे. त्यानंतर संबंधित वाहनात आवश्यक ते बदल करुन वाहन तपासणीसाठी कार्यालयीन वेळेत कार्यालयात कार्यरत मोटार वाहन निरीक्षक यांच्यासमोर सादर करावे.

प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत (प्राण्यांची पायी वाहतूक) नियम 2001 च्या नियम 96 मधील तरतुदीनुसार वाहनातून जनावरांची वाहतूक करताना वाहतूकदाराने सक्षम प्राधिकरण, भारतीय प्राणी कल्याण मंडळ व केंद्र शासनाने प्राधिकृत केलेल्या अधिकारी वा व्यक्ती वा प्राणी कल्याण संस्था यांनी जारी केलेले प्रमाणपत्र सोबत बाळगावे असे प्रमाणपत्र जारी केले नसल्यास जनावरांच्या वाहतूक करण्यास वाहतूकदाराने नकार देणे अपेक्षित आहे. तरतुदींचे पालन न केल्यास संबंधितां विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असेही अतुल आदे यांनी म्हटले आहे.

Related posts

क्रांतिवीर चापेकर बंधुंचे स्मारक प्रेरणास्थळ –राज्यपाल रमेश बैस,पुनरुत्थान गुरुकुलमधीलशिक्षण दिले कुशल मनुष्यबळाची मागणी पूर्ण करणारे,क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या सुवर्ण महोत्सवाचा सांगता समारंभ उत्साहात.

pcnews24

ब्रिटिश प्रधानमंत्री ऋषि सुनक यांनी दिला जय श्रीरामचा नारा.

pcnews24

इंदोर मध्ये हॉटेलमधून जेवण करून निघालेल्या इतर धर्माचा तरुण व मुस्लिम तरुणीला, 40 ते 50 जणांच्या, मुस्लिम जमावाकडून मारहाण

pcnews24

Thane : ठाण्यातील काही भागात पाणी कपात!

Admin

थरथरते हात अन् व्हिलचेअरवर बसून केलेल्या शेवटच्या भाषणात गिरीश बापट काय म्हणाले होते?

Admin

श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्टतर्फे यंदा अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती तर प्राणप्रतिष्ठा सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते

pcnews24

Leave a Comment