‘… तोपर्यंत छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नाही’
राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहराच्या नामांतराचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर आज सुनावणी पार पडली. कोर्टाच्या अंतिम सुनावणीपर्यंत राज्य सरकार बदललेली नावे वापरणार नाहीत अशी आशा कोर्टाने व्यक्त केली. नंतर औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नसल्याची हमी राज्य सरकारने हायकोर्टाला दिली आहे.